जीवनचरित्र

  • Home
  • जीवनचरित्र

आदरणीय अजित पवार बद्दल

महाराष्ट्राचं समाजमन कळलेलं नेतृत्व!

दिवसाचे १६-१७ तास सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आव्हान
लीलया पेलणारे मा. श्री. अजितदादा पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपणारी तलवारच.
सातत्याने गेली ३ दशके महाराष्ट्रासारख्या राज्याच्या राजकीय-सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या
नेतृत्वाकडे असलेली सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी थक्क करणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात
वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असलेले श्री.अजित पवार नवमहाराष्ट्राचे शिल्पकार आहेत.

आदरणीय अजित पावाराबद्दल

महाराष्ट्राचं समाजमन कळलेलं नेतृत्व!

दिवसाचे १६-१७ तास सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आव्हान लीलया पेलणारे मा. श्री. अजितदादा पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपणारी तलवारच. सातत्याने गेली ३ दशके महाराष्ट्रासारख्या राज्याच्या राजकीय-सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या नेतृत्वाकडे असलेली सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी थक्क करणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असलेले श्री.अजित पवार नवमहाराष्ट्राचे शिल्पकार आहेत.

शिकवण सह्याद्रीची

सन्माननीय पवार साहेब

वक्तशीरपणा, लोकांसाठी सतत उपलब्ध असणे, अडी-अडचणी सोडवणे, प्रश्न मार्गी लावणे, विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी अभ्यासपूर्ण चर्चा करून निर्णय घेणे आणि विकास साधताना कलात्मक दृष्टी जोपासण्याची वृत्ती सन्मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांची कारकीर्द जवळून पाहिल्यामुळेच श्री. अजित पवार यांच्या अंगी बाणवली गेली. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच पुढील २५-३० वर्षांचा विचार करून विकास करण्याचा श्री. अजित पवार यांचा प्रयत्न राहिला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे २२ जुलै १९५९ मध्ये श्री. अजित पवार यांचा जन्म झाला.

लहान वयातच खांद्यावर आलेली कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलत असतानाच आजूबाजूच्या सामाजिक प्रश्नांची जाणीव त्यांच्यात निर्माण झाली. शेतकरी-कष्टकऱ्यांच्या संवेदना समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी धडाडीने काम करण्यास सुरुवात केली आणि तिथेच महाराष्ट्राच्या भावी संवेदनशील नेतृत्वाची पाळं-मुळं रुजली. दूधसंघ, विविध सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका या माध्यमातून महत्त्वाची पदे भूषवित सुरु झालेल्या प्रवासाला १९९१ साली नवे वळण लागले. खासदार, आमदार, राज्यमंत्री, अनेक महत्त्वाच्या खात्यांतील मंत्रीपदे आणि महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्रीपद ४ वेळा भूषविण्याचा बहुमान या कार्यकुशल नेतृत्वाला लाभला आहे.

लोकभावना जाणून घेण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यात कुठलाही भेदभाव न करता ‘जनता दरबार’च्या माध्यमातून सत्ता असो वा नसो श्री.अजित पवार कायम लोकांच्या संपर्कात असतात. गतीमान प्रशासनासाठी ते नेहमीच आग्रही असतात. कोणाचंही ‘काम पूर्ण होणार असेल तर हो अन्यथा नाही’ असं स्पष्टपणे सांगण्याची कार्यपद्धती अजितदादांची ओळख बनली आहे.

सभागृहात प्रश्न मांडत असताना आपण ज्या जनतेच्या पाठींब्यावर उभे आहोत त्या जनतेला आपण उत्तरदायी असल्याची भावना
त्यांच्या उक्तीत आणि कृतीत दिसून येते. राज्याची भू-राजकीय समज असल्यामुळे कोणताही निर्णय घेताना मुंबईतील मंत्रालयापासून कष्टकरी-शेतकऱ्यापर्यंत, चांद्यापासून-बांद्यापर्यंत जनतेच्या दैनंदिन जीवनावर त्यामुळे कसा प्रभाव पडेल याची जाण त्यांना आहे. अहोरात्र झटणाऱ्या श्री. अजित पवार यांनी मातीशी.